चेन्नई...Training location चा mail वाचला...
माझे डोळे ते नाव नसेलच भास झाला असेल अस वाटून पुन्हा पुन्हा पुणे हें नाव कुठे दिसतंय का ह्या शोधात होते
जीव गडबडून गेला एकदम... बंगलोर पर्यंत तयारी होती मनाची...( हें आपल म्हणायला ..बाकी प्रार्थना करत होते पुण्यासाठीच )
पण चेन्नई.... ये क्या हें भाई?? कहा से टपका ये नाम? मद्रासी काफी ,अण्णा,चौकडीच्या साड्या,काळे लोकं डोळ्यासमोर नाचायला लागले आणि तिथे जाऊन राहायचं???
२-३ दिवस रडून रडून येवढा गोंधळ घातला मी , तिथे जाण कस टाळता येईल यासाठी खूप प्रयत्न केले..लहान मुलासारखी कारण देत होते ..कि project नाही मिळाला तर ,पहिल्याच दिवशी परीक्षा असली आणि नापास झाले तर ..याव्व नि त्याव ..
शेवटी आईसाहेबांसमोर डाळ शिजली नाही आणि आमची स्वारी चेन्नई साठी सज्ज होण्यास तयार झाली..
मला अस चांगल्या कारणासाठी ढसा ढसा रडताना पाहून खरच किती हसली असतील लोक? लोकं कशाला आता मलाच माझ्यावर हसायला येतंय ..
नातेवाईकांनी आईची ती step पाहून तोंडात बोट घालायची बाकी ठेवली होती
कधी भटकायला न पाठवणारी हि आज चक्क लेकीला चेन्नई ला पाठवायला तयार झाली
मला तर आणि एकदा आई म्हणजे काय हें जाणवलं , हव तिथे प्रोत्साहन देणारी ,गरज नसेल तिथे अगदी घरात डांबून (दुसरा कोणताच शब्द इथे बसणार नाही ) ठेवणारी ...
माझ्या काकाच्या एका वाक्याने माझी भीती जरा कमी झाली होती ..."अग कुठेही गेलीस तरी माणसच असतात, इथ आणि तिथे कोणी वेगळ राहत नसत "..
ह्या माणसांच्या जीवावरच आता मी दक्षिणे कडे प्रयाण करणार होते ..माहित नव्हते कि खरच कशी माणस मिळतील ,माझ पटेल सगळ्यांशी कि नाही ,कि पळून येईन मी तशीच अर्ध्यावर डाव मोडून ?खरच मिळतील का चांगली माणस मला तिथे ?
माझा त्या वर्षीचा वाढदिवस म्हणजे fairwell party होती माझ्यासाठी ..काका,काकू,मैत्रिणी,शेजारी सगळे येत होते माझी तयारी कुठवर आली ,काही मदत हवी का ,जाणार कशी ?राहणार कुठे ?एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात,आपली पोरगी आज स्वतःच्या बळावर नोकरीसाठी बाहेर पडत आहे याच कौतुक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि पहिल्यांदीच बाहेर जाणार सगळ ठीक होईल ना याची काळजी युक्त भीतीहि ..
माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने सल्ला दिला ...इथे आहात तर सगळे चेहेरे पाहून घ्या माहित नाही किती महिने असे गोरे गोरे चेहरे पाहायला मिळतील कि नाही ...
अवघे १२ दिवसात सगळी तयारी करायची होती .झुकझुक गाडी काही आमच्या कमी येणार नव्हती .. शेवटी मावशी बाईंनी इमानाचा option दिला.. इमानाची तिकीट फाडून तयार झाली ..
पहिल्यांदीच आमच ध्यान विमानाला पाय लावणार ... घर सोडून पहिल्यांदाच बाहेर जाणार,bag pack करायची ...खूप काही काम कमी दिवसात उरकायची होती
माझ्या bag च तोंड मी आ वासून ठेवलं होत जस जे सुचेल जे दिसेल लागेल ते तस त्यात भरत चालले होते .शेवटी पूज्य पिताजी नि सल्ला दिला "विमानाने चाललो आहोत बापाच्या गाडीने नाही".. मग माझी bag वाण्याच्या दुकानातील वजन काट्यावरून २० किलो माप ओलांडून परत घरात आली ."घर सोडून चाललीस कि training ला चाललीस? सगळ घर भरून नेणार आहेस का " इति मातोश्री ...
शेजारची पोरगी रोज ताईची bag किती भरली बघून जाई आणि कुणाल मात्र मला bag भरायला देत नव्हता ,मी जे भरेन ते तो बाहेर काढत होता ..आपली चंदा कुठेतरी चालली आहे आणि त्याला तीला जाउ द्यायचं नव्हत ...
गावाला जाऊन कृष्णाचे आशीर्वाद घेऊन,सगळ्यांना भेटून झालं ..१९ डिसेंबर च्या रात्री मुंबई च्या गाडीत बसताना मैत्रीणीना senti message मारून झाले त्यांनीही senti reply देण्यात काही कमी ठेवली नाही ..जणू काही त्यांची मैत्रीण फार मोठे दिवे लावायला चालली होती परदेशात ...
खूप लोकं जातात कुठे कुठे पण मी पहिल्यांदीच माझ्या छोट्याश्या विश्वातून माझ्यासाठी मोठ्या असणारया विश्वात चालले होते ...माझ्यासाठी ते परदेशाहून कमी नव्हत ...
रत्नागिरी सोडताना मनावर खूप दडपण होते,पहिल्यांदीच बाहेर जायचं होत, training यशस्वी पणे पार पाडायचं होत.
माझ्यावर आई,बाबा,नातेवाईक ,मैत्रिणी या सगळ्यांची बोलून न दाखवता लादलेली अपेक्षांची ओझी सांभाळत मी रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या दिव्यांत निजणाऱ्या छोट्याश्या रत्नागिरीला अलविदा केला...
आता पाहायची होती कधी रात्र न होणारी,अखंड झगमगणारी, माणसांच्या महापुरात कायम जागी राहणारी मोठी शहर ..
छोट्याश्या तलावातल पिल्लू आता महापुरात निघाल होत ....
मुंबई
पहाटेच्या पारी एक छोतुशी बस आम्हाला विमाना पर्यंत घेऊन गेली ...कधीतरी विमानात बसू अस स्वप्न हि न पाहिलेल्या मला हें सार अजूनही स्वप्न वाटत होत
लहान मुलांना एखादी गोष्ट प्रथमच पाहिल्यावर जस वाटत तसच काहीस माझ झालं होत .धडाधड सगळ्यांना message टाकले कि Now in Flight,waiting 4 tk off ..
Take off च्या वेळी लहान मुलासारख जोरात हुर्रे ओरडावस वाटत होत,नाचा व वाटत होत,
मी गालातल्या गालात माझ हसू कोंडून,कोणी बघत नाही ना आपल्याला पाहत होते.
विमानातल्या सुंदऱ्या बिचाऱ्या फेरीवाल्यासारख्या इकडून तिकडून खाण्या पिण्याच्या गाड्या फिरवत होत्या आधी पोटाला पट्टा कसे बांधा,काय करा,काय नका करू ह्याचा मुकाभिनय करून आता हें काम...बहुरुप्यासारख..तोंड रंगवून सगळी काम करा ...
पण मला त्यांच्या त्या थोबाडावर लावलेल्या make up च्या थरात बिलकुल interest नव्हता .. ते १.३० तास फक्त मी ढगांचे हलके पुंजके बघत होते ..बाकी काही दिसत नव्हत तरी काही दिसतंय का ह्या शोधात ....महाराष्ट्र , आंध्रप्रदेश,तामिळनाडू यांच्या न दिसणारया पण राजकारणात अस्तित्वात असणाऱ्या सीमा शोधत....
माझे डोळे ते नाव नसेलच भास झाला असेल अस वाटून पुन्हा पुन्हा पुणे हें नाव कुठे दिसतंय का ह्या शोधात होते
जीव गडबडून गेला एकदम... बंगलोर पर्यंत तयारी होती मनाची...( हें आपल म्हणायला ..बाकी प्रार्थना करत होते पुण्यासाठीच )
पण चेन्नई.... ये क्या हें भाई?? कहा से टपका ये नाम? मद्रासी काफी ,अण्णा,चौकडीच्या साड्या,काळे लोकं डोळ्यासमोर नाचायला लागले आणि तिथे जाऊन राहायचं???
२-३ दिवस रडून रडून येवढा गोंधळ घातला मी , तिथे जाण कस टाळता येईल यासाठी खूप प्रयत्न केले..लहान मुलासारखी कारण देत होते ..कि project नाही मिळाला तर ,पहिल्याच दिवशी परीक्षा असली आणि नापास झाले तर ..याव्व नि त्याव ..
शेवटी आईसाहेबांसमोर डाळ शिजली नाही आणि आमची स्वारी चेन्नई साठी सज्ज होण्यास तयार झाली..
मला अस चांगल्या कारणासाठी ढसा ढसा रडताना पाहून खरच किती हसली असतील लोक? लोकं कशाला आता मलाच माझ्यावर हसायला येतंय ..
नातेवाईकांनी आईची ती step पाहून तोंडात बोट घालायची बाकी ठेवली होती
कधी भटकायला न पाठवणारी हि आज चक्क लेकीला चेन्नई ला पाठवायला तयार झाली
मला तर आणि एकदा आई म्हणजे काय हें जाणवलं , हव तिथे प्रोत्साहन देणारी ,गरज नसेल तिथे अगदी घरात डांबून (दुसरा कोणताच शब्द इथे बसणार नाही ) ठेवणारी ...
माझ्या काकाच्या एका वाक्याने माझी भीती जरा कमी झाली होती ..."अग कुठेही गेलीस तरी माणसच असतात, इथ आणि तिथे कोणी वेगळ राहत नसत "..
ह्या माणसांच्या जीवावरच आता मी दक्षिणे कडे प्रयाण करणार होते ..माहित नव्हते कि खरच कशी माणस मिळतील ,माझ पटेल सगळ्यांशी कि नाही ,कि पळून येईन मी तशीच अर्ध्यावर डाव मोडून ?खरच मिळतील का चांगली माणस मला तिथे ?
माझा त्या वर्षीचा वाढदिवस म्हणजे fairwell party होती माझ्यासाठी ..काका,काकू,मैत्रिणी,शेजारी सगळे येत होते माझी तयारी कुठवर आली ,काही मदत हवी का ,जाणार कशी ?राहणार कुठे ?एक ना अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात,आपली पोरगी आज स्वतःच्या बळावर नोकरीसाठी बाहेर पडत आहे याच कौतुक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि पहिल्यांदीच बाहेर जाणार सगळ ठीक होईल ना याची काळजी युक्त भीतीहि ..
माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने सल्ला दिला ...इथे आहात तर सगळे चेहेरे पाहून घ्या माहित नाही किती महिने असे गोरे गोरे चेहरे पाहायला मिळतील कि नाही ...
अवघे १२ दिवसात सगळी तयारी करायची होती .झुकझुक गाडी काही आमच्या कमी येणार नव्हती .. शेवटी मावशी बाईंनी इमानाचा option दिला.. इमानाची तिकीट फाडून तयार झाली ..
पहिल्यांदीच आमच ध्यान विमानाला पाय लावणार ... घर सोडून पहिल्यांदाच बाहेर जाणार,bag pack करायची ...खूप काही काम कमी दिवसात उरकायची होती
माझ्या bag च तोंड मी आ वासून ठेवलं होत जस जे सुचेल जे दिसेल लागेल ते तस त्यात भरत चालले होते .शेवटी पूज्य पिताजी नि सल्ला दिला "विमानाने चाललो आहोत बापाच्या गाडीने नाही".. मग माझी bag वाण्याच्या दुकानातील वजन काट्यावरून २० किलो माप ओलांडून परत घरात आली ."घर सोडून चाललीस कि training ला चाललीस? सगळ घर भरून नेणार आहेस का " इति मातोश्री ...
शेजारची पोरगी रोज ताईची bag किती भरली बघून जाई आणि कुणाल मात्र मला bag भरायला देत नव्हता ,मी जे भरेन ते तो बाहेर काढत होता ..आपली चंदा कुठेतरी चालली आहे आणि त्याला तीला जाउ द्यायचं नव्हत ...
गावाला जाऊन कृष्णाचे आशीर्वाद घेऊन,सगळ्यांना भेटून झालं ..१९ डिसेंबर च्या रात्री मुंबई च्या गाडीत बसताना मैत्रीणीना senti message मारून झाले त्यांनीही senti reply देण्यात काही कमी ठेवली नाही ..जणू काही त्यांची मैत्रीण फार मोठे दिवे लावायला चालली होती परदेशात ...
खूप लोकं जातात कुठे कुठे पण मी पहिल्यांदीच माझ्या छोट्याश्या विश्वातून माझ्यासाठी मोठ्या असणारया विश्वात चालले होते ...माझ्यासाठी ते परदेशाहून कमी नव्हत ...
रत्नागिरी सोडताना मनावर खूप दडपण होते,पहिल्यांदीच बाहेर जायचं होत, training यशस्वी पणे पार पाडायचं होत.
माझ्यावर आई,बाबा,नातेवाईक ,मैत्रिणी या सगळ्यांची बोलून न दाखवता लादलेली अपेक्षांची ओझी सांभाळत मी रात्रीच्या अंधारात लुकलुकणाऱ्या दिव्यांत निजणाऱ्या छोट्याश्या रत्नागिरीला अलविदा केला...
आता पाहायची होती कधी रात्र न होणारी,अखंड झगमगणारी, माणसांच्या महापुरात कायम जागी राहणारी मोठी शहर ..
छोट्याश्या तलावातल पिल्लू आता महापुरात निघाल होत ....
मुंबई
पहाटेच्या पारी एक छोतुशी बस आम्हाला विमाना पर्यंत घेऊन गेली ...कधीतरी विमानात बसू अस स्वप्न हि न पाहिलेल्या मला हें सार अजूनही स्वप्न वाटत होत
लहान मुलांना एखादी गोष्ट प्रथमच पाहिल्यावर जस वाटत तसच काहीस माझ झालं होत .धडाधड सगळ्यांना message टाकले कि Now in Flight,waiting 4 tk off ..
Take off च्या वेळी लहान मुलासारख जोरात हुर्रे ओरडावस वाटत होत,नाचा व वाटत होत,
मी गालातल्या गालात माझ हसू कोंडून,कोणी बघत नाही ना आपल्याला पाहत होते.
विमानातल्या सुंदऱ्या बिचाऱ्या फेरीवाल्यासारख्या इकडून तिकडून खाण्या पिण्याच्या गाड्या फिरवत होत्या आधी पोटाला पट्टा कसे बांधा,काय करा,काय नका करू ह्याचा मुकाभिनय करून आता हें काम...बहुरुप्यासारख..तोंड रंगवून सगळी काम करा ...
पण मला त्यांच्या त्या थोबाडावर लावलेल्या make up च्या थरात बिलकुल interest नव्हता .. ते १.३० तास फक्त मी ढगांचे हलके पुंजके बघत होते ..बाकी काही दिसत नव्हत तरी काही दिसतंय का ह्या शोधात ....महाराष्ट्र , आंध्रप्रदेश,तामिळनाडू यांच्या न दिसणारया पण राजकारणात अस्तित्वात असणाऱ्या सीमा शोधत....
No comments:
Post a Comment